
गोवंशीय जनावरे चोरणारी आंतरराज्यीय टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन सेनगाव तसेच नर्सी नामदेव हददीत शेतक-यांचे पशुधन जनावरे चोरीचे घटना घडल्या होत्या त्याबाबत संबंधीत पोलिस स्टेशनला फिर्यादी शेतकरी यांचे तकारीवरून अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते
सदरचे गुन्हे उघड करून गुन्हयातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक . जी. श्रीधर यांनी
स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देवुन मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक
गुन्हे शाखा हिंगोली येथील सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे तपास पथकाने नमुद घटनास्थळी व परीसरात भेटी देवुन
तंत्रशुध्द तपास पध्दती व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने माहीती घेत सदरचे गुन्हे हे
१) राजु देवराव गव्हाणे वय २२वर्ष


२) नामदेव देवराव गजभार वय ३२ वर्ष

३) शेषराव धर्मा वंजारे वय ४० वर्ष

४) रामेश्वर सिताराम महाजन सर्व रा. कळमेश्वर ता.मालेगाव जि.वाशिम
यांनी केले व चोरून नेले या बाबत तपास पथकाला माहीती मिळाली वरून
स्थागुशाच्या पथकाने नमुद आरोपींचे गावी जावुन सापळा रचुन यातील आरोपी क्र. १ ते ३ यांना शितीफीने ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी वर नमुद पोलिस स्टेशन सेनगाव व नर्सी नामदेव सोबतच कळमनुरी पोस्टे अंतर्गत ०२ जनावरे चोरी असे जिल्हयात एकुण ०४ जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. ते खालील प्रमाणे.
१) पो.स्टे. सेनगाव गुरनं. २८० / २०२३ कलम ३७९ भादवी
२) पो.स्टे. नर्सी नामदेव गुरनं ९७ / २०२३ कलम ३७९ भादवी
३) पो.स्टे. कळमनुरी गुरनं. ७८/२०२३ कलम ३७९ भादवी
४) पो.स्टे. कळमनुरी गुरनं. ४१२ / २०२३ कलम ३७९ भादवी
आरोपीकडुन गुन्हयात चोरून नेलेले पशुधन जनावरे विक्री करून प्राप्त केलेले नगदी ८३,००० रू. व गुन्हयात
वापरलेले चारचाकी वाहन टेम्पो किं. ५,००,००० रू. असा एकुण ५,८३,००० रू. चा मुददेमाल जप्त करण्यात
आला आहे. नमुद आरोपींविरूध्द वाशिम जिल्हयात विवीध पोलीस स्टेशनला जनावरे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीनां पुढील तपासकामी पोलिस स्टेशन सेनगाव यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीघर, अपर पोलिस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक स्थागुशा पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश मलपिलु, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, विठठल काळे, महादु शिंदे, ज्ञानेश्वर पायघन, हरीभाउ गुंजकर, प्रशांत वाघमारे,
दिपक पाटील, दत्ता नागरे यांनी केली.


