वर्धा पोलिसांची ‘वॉशआऊट’ मोहीम: १.०४ कोटींची अवैध दारू जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा:

जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि निर्मितीची साखळी समूळ नष्ट करण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाने २९ ते ३० ऑगस्ट दरम्यान विशेष ‘वॉशआऊट’ मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. २-दिवसांच्या या धडक कारवाईत पोलिसांनी १ कोटी ४ लाख ९५ हजार रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले.



पहाटे ६ पासून एकाच वेळी छापेमारी

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आखण्यात आली. जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३७ अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेशह एकूण २६३ पोलीस अंमलदारांनी २९ ऑगस्टच्या पहाटे ६.०० वाजेपासून एकाच वेळी जिल्ह्यातील विविध अड्ड्यांवर धाडी टाकल्या.



कारवाईचा प्रमुख तपशील:

  • कालावधी: २९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६



  • एकूण गुन्हे दाखल: १२८ गुन्हे (२५ अवैध देशी/विदेशी दारू आणि १०३ गावठी दारू विक्रीचे)

  • आरोपी: १२९ जणांवर कारवाई



  • एकूण जप्ती/नुकसान: १,०४,९५,०७५ रुपये (१ कोटी ४ लाख ९५ हजार ७५ रुपये)

दुर्गम भागात ‘सर्जिकल स्ट्राईक’

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू गाळून तिची साठवणूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहरालगतचा परिसर, गावाबाहेर, जंगल शिवार तसेच दुर्गम भागातील गावठी दारूच्या भट्ट्यांवर लक्ष ठेवून ही गुप्त मोहीम राबवण्यात आली. बाहेरील जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या दारूच्या विक्रीवरही पोलिसांनी पाळत ठेवून धडक कारवाई केली.

कठोर कारवाईचे संकेत

या अचानक केलेल्या कारवाईमुळे अवैध दारू उत्पादक आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. “वर्धेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शांतता भंग करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशाच प्रकारची ‘वॉशआऊट’ मोहीम आणि कठोर कारवाई सुरूच राहील,” असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिला आहे.

कारवाईची पार्श्वभूमी आणि नियोजन:

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारू गाळून तिचा साठा केला जात असल्याची तसेच बाहेरील जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहरालगतचा परिसर, गावाबाहेर, जंगल शिवार आणि दुर्गम ठिकाणांवर गोपनीय पाळत ठेवून ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या धर्तीवर ही योजना आखण्यात आली.

सहभागी पोलीस दल:

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३७ अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेशह एकूण २६३ पोलीस अंमलदारांनी या धडक मोहिमेत सहभाग घेतला.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!