
सायबर गुन्हेगारीवर बसणार चाप,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॅाट अॅप चे लोकार्पन…
भंडारा पोलीसांकडुन ‘व्हॉट्सअप सायबर बॉट’ चे उद्घाटन,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा पहिलाच जिल्हा…
भंडारा (प्रतिनिधी) : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा बसावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधिक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या व्हॉट्सअप सायबर बॉट चे विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परीक्षेत्र,नागपुर डॉ.दिलीप भुजबळ पाटील याच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. सायबर बॅाट च्या मदतीने नागरिकांना त्यांच्या समस्यांचे तक्रारीचे निवारण त्या बरोबरच मार्गदर्शन करण्यासाठी भंडारा पोलिस दलात पहिल्यांदाच व्हॉट्सअप सायबर बॉट चा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अशी सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा भंडारा हा पहिला जिल्हा असणार आहे.


पोलिस रेझींग डे सप्ताह च्या अनुषंगाने भंडारा जिल्हा पोलिस दला तर्फे आयोजीत पोलिस प्रदर्शनी दरम्यान (दि.०६जानेवारी) रोजी सायबर बॉट या भंडारा सायबर सेल च्या वतीने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे मार्गदर्शनात व्हाट्सअप आधारीत सायबर बॉट क्र. ७४४७४७०१०० याचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परीक्षेत्र,नागपुर डॉ. दिलीप भुजबळ पाटील याच्या हस्ते करण्यात आले. सदर सायबर बॉट द्वारे नागरीकांना त्यांच्या सायबर विषयक समस्यांसाठी जागीच मदत मिळणार आहे. सदर सायबर बॉट मुळे नागरीकांच्या समस्यांसाठी तात्काळ सहाय्य, सामान्य शंका आणि प्रश्नांना उत्तर मिळणार असुन त्यामुळे नागरीकांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहार, सायबर धोके आणि वित्तीय फसवणुक याबाबत माहिती मिळणार आहे.

सदर सायबर बॉट हे सायबर क्राइम संबंधी प्रश्नांची उत्तरे तक्रारी कशा नोंदवाव्यात याबाबत नागरीकांना सहाय्य करुन मार्गदर्शन करणार असल्याने नागरीकांना जागीच एका क्लिकवर सायबर समस्यांचे निवारणा करीता पर्याय उपलब्ध झाला आहे.

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सदर सायबर बॉट बाबत आम्ही सर्वांसाठी तंत्रज्ञानाद्वारे तात्काळ मदत उपलब्ध करुन नागरीकांना सायबर सुरक्षित व डिजीटल साक्षर बनविण्याच्या दृष्टीने एक महत्वपुर्ण पाउल उचलले असुन महाराष्ट्रात अशी सायबर बॉट प्रणाली सुरु करणारा भंडारा पहिला जिल्हा असल्याचे सांगीतले. भंडारा पोलीस हे तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरीकांना सेवा देण्यास तत्पर आहेत व सर्वांनी या सेवेचा लाभ घेवुन डिजीटल युगात जागरुक व सावध राहुन सायबर साक्षर होण्याचे आवाहन केले आहे.


