कत्तलीकरीता जाणाऱ्या १२१ जनावरांना चंद्रपुर पोलिसांनी दिले जिवनदान,८० लाखाचेवर मुद्देमाल केला जप्त…
स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन गोंडपिपरी यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत कत्तलीकरीता जाणारी एकुन १२१ जनावरांना दिले जिवनदान…
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. 08 जुलै 2024 रोजी गोपनीय बातमीदराकडुन माहीती मिळाली की गडचिरोली कडुन गोंडपिपरी बल्लारशा मार्गाने गोवंशीय जनावरांची अवैद्यरित्या ट्रक मध्ये कोंबुन कत्तली वाहतुक केली जाणार आहे अशा खात्रीशीर बातमीवरुन स्थानिक गुन्हे शाखेने कडुन गोंडपिपरी ते बल्लारशा रोडवर आक्सापूर चौक येथे सकाळी 08/00 वा.चे दरम्यान नाकाबंदी लावण्यात आली असता सदर नाकाबंदी मध्ये मौजा गोंडपीपरी कडून दोन ट्रक संशयीतरित्या येताना दिसल्याने त्यांना ईशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते न थांबता पळून गेले.
त्यांचा सिनेस्टाईल पध्दतीने पाठलाग केला असता सदर दोन्ही ट्रक चालकांनी आपले ताब्यातील वाहने रोडचे बाजूला लावून जंगलाचे दिशेने पळून गेले. सदरची वाहने ताब्यात घेवून कत्तली करिता जाणारे गोवंश जनावरे गोशाळेत सोडण्यात आले. सदर कार्यवाहीत दोन ट्रक व एकुण 77 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली सदर कारवाही मध्ये एकुण 57,70,000/- रू. चा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पोलिस स्टेशन गोंडपिपरी यांचे कडुनही अवैधरित्या गोंवश वाहतूक करीत असताना नाकाबंदी दरम्यान एक ट्रक व 44 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असुन एकुण 14,50,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच काल दि. 07/08/ 2024 रोजी पोस्टे गडचांदूर नी नाकाबंदी दरम्यान एक ट्रक व 34 गोवंशीय जनावरे असा एकुण 21,80,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पोलिस अधिक्षक . मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्हयाचा पदभार स्विकारला तेव्हा पासुन स्थानिक गुन्हे शखा चंद्रपूर व पोलिस स्टेशन यांचे मार्फत अवैदय रित्या गोवंश जनावर वाहतूकीचे एकूण 54 गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकूण 1412 गोंवश जातीच्या जनावरांची मुक्तता करण्यात आली असुन संपूर्ण जिल्हयात 8,27,39,000/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे, पो. हवा. दिपक डोंगरे, नापोशि संतोष येलपुलवार, पो.शि.नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार, अमोल सावे, वैभव पत्तीवार यांनी केली.