महाराष्ट्र पोलिसांचा गणवेष बदलणार लवकरच घोषणा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेषात लवकरच महत्वपुर्ण बदल होणार- देवेन्द्र फडनविस…

मुंबई(प्रतिनिधी) –  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आयोजित मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पोलिसांच्या बुटांबाबत प्रश्न उपस्थित केला होता, ज्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बदलाचे संकेत दिले.
अक्षय कुमारने मुलाखतीत पोलिसांच्या बुटांच्या रचनेवर भाष्य केले. सध्याचे टाचांचे बूट धावपळ आणि पाठलाग करताना पोलिसांना अडथळा ठरतात. क्रीडापटूंप्रमाणे हलके आणि पळण्यास सोयीचे बूट उपलब्ध झाल्यास पोलिसांचे कार्यक्षमतेत वाढ होईल, असा मुद्दा त्याने मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा गांभीर्याने ऐकून घेतला.व त्याला सकारात्मक प्रतिसाद सुध्दा दिला
गृहमंत्री पदाची जबाबदारी संभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अक्षय कुमार यांच्या सूचनेचे स्वागत केले. आतापर्यंत पोलिसांचे बूट संचलनासाठी वापरले जात असल्याने त्यांच्या डिझाइनकडे विशेष लक्ष दिले गेले नव्हते. मात्र, अक्षयने उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगत, पळण्यास सोयीचे बूट देण्यासाठी लवकरच नियोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.तसेच मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारला नव्या बुटांच्या डिझाइनसाठी सहकार्य करण्याची विनंतीही केली. अक्षय कुमारच्या सूचनेमुळे पोलिसांच्या गणवेशात कार्यक्षमता वाढवणारा बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात पोलिसांना हलके आणि वेगवान पळण्यास उपयुक्त बूट मिळू शकतील.







पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकदा तातडीने धावपळ करावी लागते. सध्याचे बूट त्यांच्या गतीवर मर्यादा आणतात. नव्या डिझाइनचे बूट पोलिसांना अधिक चपळ आणि प्रभावी बनवतील, असे अक्षयने नमूद केले.



या बदलामुळे महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश आधुनिक आणि कार्यक्षम होईल. मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे संकेत देत पोलिसांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित केल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो, असे मत व्यक्त करण्यात येतंय.



महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश हा काळानुसार आधुनिकता, व्यावहारिकता आणि सांस्कृतिक बदलांनुसार विकसित होत आला आहे. ब्रिटिश काळापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आजही चालू आहे. १६६९ मध्ये भांडारी मिलिशियाच्या लाल रंगाच्या गणवेशापासून (ब्रिटिश सेनेप्रमाणे) सुरुवात झाली. १८३८ पर्यंत मुंबई पोलिसांकडून निळे शॉर्ट्स आणि पँट्स वापरले जात, ज्याला ‘नीली बाटली, पिवळी बुच’ म्हणून ओळखले जात असे. १९०५ नंतर पांढऱ्या युनिफॉर्मचा समावेश झाला, जो औपचारिक प्रसंगांसाठी वापरला गेला. मात्र, धूळ आणि कीचडामुळे तो घाण होत असल्याने तो अवघड ठरला.स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये मंकी कॅप काढून टाकली गेली आणि लांब पँट्स छोट्या केल्या गेल्या. १९५० च्या दशकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात पांढऱ्या युनिफॉर्मची समस्या उद्भवली, ज्यामुळे १९५३ मध्ये खाकी रंगाचा प्रस्ताव आला. १९५५-५६ मध्ये तो लागू झाला, ज्यामुळे मुंबईतील पोलिसांना खाकी शर्ट आणि पँट्स मिळाल्या. १९७८ मध्ये समितीने शॉर्ट्सऐवजी खाकी ट्राउझर्सची शिफारस केली, जी १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांच्या काळात अनिवार्य झाली. यामुळे हालचाली सुलभ झाल्या आणि पोलिसांना आदर मिळाला. २०१८ मध्ये खाकी कपड्यांच्या एकसमान रंगासाठी (PANTONE 18-1022 TCX) खरेदीची घोषणा झाली. २०२२ मध्ये PSI ते DySP दर्जासाठी ट्युनिक युनिफॉर्म बंद झाली.

नुकत्याच २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारच्या सूचनेनुसार धावण्यास सोयीचे बूट देण्याचे आश्वासन दिले. हे बदल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे प्रतिबिंब आहेत, ज्यामुळे गणवेश आधुनिक आणि प्रभावी बनला





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!