
ग्राहक सेवा केंद्र धारकाची आर्थिक फसवणुक करणाऱ्यास जालना सायबर पोलिसांनी केली अटक…
जालना – सवीस्तर व्रुत्त असे की मलकापुर जि. जालना येथे राहणारा साईनाथ गंगाधर वाघमारे वय २९ वर्ष धंदा व्यवसाय यांनी सायबर पोलिस ठाणे, जालना येथे तक्रार दिली होती की, दि. २६/०९/२३ रोजी सायंकाळी ०४.३७ वा. ते ०५.०० वा. दरम्यान एका अनोळखी इसम त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात आला. त्यावेळी त्याने फिर्यादीस त्याच्या मित्राम फोनपेद्वारे पैसे पाठवायचे आहे असे सांगून फिर्यादींकडून मोबाईल क्रमांक टाकण्यासाठी मोबाईल घेउन फिर्यादी कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेउन मोबाईलमध्ये १०००/रु. ऐवजी १,०००,००/-रु. रक्कम टाकून फोनपेच्या खात्यावर स्वतःच परस्पर ॲानलाईन पाठवून फिर्यादींची ऑनलाईन फसवणूक केली म्हणून सायबर पोलीस ठाणे गु.र.क्र.
२९/२०२३ कलम ४०६,४२० भादंविसह कलम ६६ (क) ६६(ड) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील फिर्यादींच्या बँक स्टेटमेंटचे विश्लेषण केले असता त्यांच्या खात्यातील रक्कम युपीआयद्वारे इतर बँक खात्यात वर्ग तपासात निष्पन्न झाले म्हणून संबंधित बँकेकडून खातेधारकाची माहिती मागीतली असता आरोपीने ज्या विविध बँक खात्यांत युपीआयद्वारे ऑनलाईन रक्कम वर्ग केली त्या बँक खात्यांचे व खात्याला लिंक असलेले मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा आरोपी युवराज अंबादास डगळे वय
१९ वर्ष धंदा मजूरी रा.गांव/पोस्ट विळवंडी, ता. दिंडोरी जि.नाशिक याने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपीचा तांत्रिक पद्धतीने शोध घेउन आरोपी भोकरदन जि.जालना येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपीस सपोनि कामुळे, पोना. मांटे, पोशि भवर, घुशिंगे यांनी भोकरदन येथून ताब्यात घेऊन अटक केले असून आरोपीकडून गुन्हयात वापरलेला मोबाईल व सिमकार्ड असा एकूण १६,०००/रु. रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील फसवणूक केलेले १ लाख रु. रक्कम आरोपीने ऑनलाईन गेम खेळण्यात वापरली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक . शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शालीनी नाईक,सपोनि सुरेश कामुळे, सपोनि वडते, सफौ पाटोळे, पोहवा राठोड, पोहक. बाविस्कर, वाघुंडे, पोना.मांटे, पीशि गुसिंगे, भवर,मुरकुटे यांनी केली आहे.
सायबर पोलिस ठाणेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज/लिंक/फोन/क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी फोनद्वारे देऊ नये किंवा लिंकवर क्लिक/क्यू आर कोड स्कॅन करू नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्प लाईन क. १९३० वर कॉल करून सायबर गुन्हयाची माहिती दयावी किंवा
www.cybercrime.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे, जालना येथे
तात्काळ संपर्क करावा.


