
वर्घा जिल्हा पोलिस दलातील २५ वर्ष पुर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांचे सहपरीवार स्नेहमिलन सोहळा पार पडला…
वर्धा जिल्हा पोलिस दलात २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण करणार्या कर्मचार्यांचा सहकुंटुंब स्नेहमिलन सोहळा साजरा…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५/०१/२०२५ रोजी वर्धा जिल्हा पोलिस दलामध्ये नोकरीचे २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण केल्याबददल बॅच २००० च्या मित्रांनी स्नेहमिलन सोहळा मेघदुत लॉन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे आयोजीत केला होता.


सदर स्नेहमिलन सोहळयाकरीता अध्यक्ष म्हणुन मा. श्री. पवनकुमार शुक्ला (पंडीत गुरुजी) माजी राखीव पोलिस निरीक्षक तसेच प्रमुख पाहुणे मा. श्री. राजेशजी उमरे, सहायक फौजदार तथा वर्धा जिल्हा क्रिडा प्रमुख, मा.श्री. अनंता ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक, अमरावती शहर हे आमंत्रित होते. कार्यक्रमा दरम्यान सुरुवातीला बॅचमधील दिवंगत अंमलदार रमेश ससाने, योगेश हिवसे, संजय मुजबैले व प्रविण नागरे यांना विनम्र अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच पाहुण्यांचे स्वागत कैलास सोनवणे, नंदकिशोर पवार बुलढाणा, अनिल भुक्तार हिंगोली, सुनिता चरपे, सुवर्णा घडे व वंदना भारस्कर यांनी केले.

सर्व बॅचच्या अंमलदारांना २५ वर्ष पुर्ण झाल्याने उपस्थित अंमलदारांना अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले तसेच अंमलदारांच्या गुणवंत पाल्यांचा सुध्दा गौरवचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मकरसंक्रातीच्या पर्वावर अंमलदारांच्या पत्नीना २००० बॅचमधील महिला अंमलदारांनी हळदीकुंकु लावुन स्वागत केले.

पोलीस विभागात उत्कृष्ट सेवेबाबत मा. पोलीस महासंचालक, म. रा. मुंबई यांचेकडील विशेष पदक पो.हवा. अमर लाखे व महिला पोहवा. सत्यभामा लोणारे यांना मिळाल्याने त्यांचा सुध्दा प्रमुख पाहण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन २००० बॅचचे अधिकारी झालेले व प्रमुख पाहुने असलेले पोलिस निरीक्षक अमरावती शहर मा. श्री. अनंता ठाकरे यांनी केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रशांत नांदेडकर व किशोर शेंदरे यांनी केले.


